yogi

Yogi Adityanath : वक्फ बोर्डाने बळकावलेली सर्व जमीन परत घेणार, योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Yogi Adityanath: सीएम योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे.

Yogi Adityanath : सध्या वक्फ बोर्ड आणि त्यांच्या जमिनींबाबत राजकीय तापमान तापलंय आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. वक्फच्या नावावर कब्जा केलेली एकेक इंच जमीन राज्य सरकार काढून घेणार आहे. हे वक्फ बोर्ड आहे की भूमाफिया बोर्ड हेच सांगता येणार नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. राज्य सरकारने वक्फ बोर्डाच्या नियमांत बदल केला आहे. आता त्यांच्या ताब्यात असलेली जर्व जमीन तपासली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. Yogi Adityanath

वक्फ बोर्डाच्या नावावर हडपलेली सर्व जमीन सरकार ताब्यात घेईल आणि त्याचा वापर गरीबांसाठी घरे, शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल बांधण्यासाठी केला जाईल, असे ते म्हणाले. सनातन धर्माची प्रतिमा ही आकाशापेक्षा उंच आणि समुद्रापेक्षा खोल आहे. सनातन धर्माची तुलना कोणत्याही संप्रदाय किंवा धर्माशी केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच कुंभाची परंपरा वक्फपेक्षा खूप प्राचीन असल्याचे म्हटले आहे. Yogi Adityanath

एका खाजगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘महाकुंभ महासंमेलन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते. देवासुर युद्धानंतर, प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र ठिकाणी अमृताचे थेंब पडले. भारताचे ज्ञान, विचार आणि सामाजिक दिशा या ठिकाणी महाकुंभ आयोजित करण्याच्या संधी निश्चित करत आहेत. ते म्हणाले, महाकुंभ हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो भारताच्या आध्यात्मिक वारसा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. कार्यक्रमादरम्यान, भारतातील ऋषी-मुनी एकत्र येत आणि त्यावेळच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर चिंतन करायचे. हा कार्यक्रम केवळ परंपरेचा सन्मान करण्यासाठी नाही, तर भावी पिढ्यांसाठी ती जपण्यासाठीही महत्त्वाची आहे.

तसेच समाजवादी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, डॉ.राम मनोहर लोहिया म्हणाले होते की, भारताला समजून घ्यायचे असेल तर राम, कृष्ण आणि शिवाची परंपरा ऐका. अयोध्येच्या विकासाचा उल्लेख करून ते म्हणाले की, आम्ही अयोध्येला विकास आणि वारसा केंद्र बनवले. अयोध्येच्या विकासाला विरोध करणाऱ्यांना तिथे जाण्याचा नैतिक अधिकार नाही. Yogi Adityanath

संभलमधील धार्मिक स्थळांच्या वादावर पुराणात श्री हरी विष्णूचा दहावा अवतार असलेल्या कल्कीचा उल्लेख आहे. धार्मिक स्थळे पाडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. आमच्या सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करून कडक संदेश दिला. धर्मांतर आणि स्वगृही परतण्याच्या मुद्द्यावर जर सद्सद्विवेकबुद्धीने कोणी आपल्या धर्मात परत यायचे असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. हे धर्म आणि परंपरेबद्दल जागरूकतेचे लक्षण आहे. Yogi Adityanath.

‘बबन गित्तेंना वाल्मिक कराडने अडचणीत आणले’, रोहित पवारांचा धनंजय मुंडेंना राजीनाम्याचा सल्ला

More From Author

Rohit Pawar Clear Advise

Rohit Pawar Clear Advise: ‘बबन गित्तेंना वाल्मिक कराडने अडचणीत आणले’, रोहित पवारांचा धनंजय मुंडेंना राजीनाम्याचा सल्ला

Union Budget 2025

Union Budget 2025: वार्षिक 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर सवलत; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत