Amit Shah On Pok: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरबाबत एक मोठे विधान केले आहे.
Amit Shah On Pok: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरबाबत एक मोठे विधान केले आहे. आज, (02 जानेवारी, 2025) दिल्ली येथे ‘जम्मू-काश्मीर आणि लडाख: हिस्टोरिकल अकाउंट ऑफ कंटिन्युटी अँड कनेक्टिव्हिटी’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात शहांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की काश्मीरचे नाव कश्यपपासून असू शकते, असं शहा म्हणाले. तसेच, शंकराचार्य, सिल्क रूट आणि हेमिश मठ याच्यावरून हे सिद्ध होते की, भारतीय संस्कृतीचा पाया हा काश्मीमध्येच घालण्यात आला. इथे सुफी आणि बौद्ध संस्कृती देखील खूप चांगल्या पद्धतीने रूजली गेली.
काश्मिरी, डोगरी, बाल्टी, झंस्करारी या भाषांना सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी काश्मीर संदर्भात खूप विचार करतात. काश्मीरमधील ज्या स्थानिक भाषा आहेत त्या जीवंत राहिल्या पाहिजेत, त्यांचे जतन झाले पाहिजे. ब्रिटिशांच्या काळात लिहिलेल्या इतिहासाची व्याख्याच चुकीचा होती. संपूर्ण जगाशी भारताचे संस्कृतीचे नाते आहे. या देशाकडे फक्त भूराजकीय दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांना देशाने, भारताची व्याख्या करू नये. काश्मीरमध्ये जी कला, वाणिज्य आणि संस्कृती होती, ती हळूहळू संपूर्ण भारतात पसरली गेली, ती आजही भारताचा अविभाज्य भाग होती आणि कायम राहील, असं अमित शहांनी म्हटले आहे. Amit Shah On Pok
मोदी सरकारने कलम 370 रद्द करण्याचे काम केले. या 370 ने काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाची बीजे पेरली. 370 हटवल्यानंतर दहशतवादी घटना कमी झाल्या. खोऱ्यातील दहशतवादाची परिसंस्था उद्ध्वस्त झाली. अनेकदा लोक मला विचारतात की, कलम 370 आणि दहशतवादाचा काय संबंध आहे? त्यांना कदाचित माहित नसेल की, कलम 370 नेच खोऱ्यातील तरुणांच्या मनात फुटीरतावादाची बीजे पेरण्याचा प्रयत्न केला. देशाच्या इतर भागात दहशतवाद का आला नाही? गुजरात आणि पंजाब पाकिस्तानला लागून आहेत.
कलम 370 ने भारत आणि काश्मीरमधील संबंध तात्पुरते असल्याचा गैरसमज पसरवण्याचे काम केले. यामुळे अलिप्ततावादाची बीजे पेरली गेली आणि पुढे त्याचे रूपांतर दहशतवादात झाले. 40 हजारांहून अधिक लोक बळी पडले. कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादात 70 टक्क्यांहून अधिक घट झाली. 370 हा दहशतवादाचा स्रोत होता हे सिद्ध करते, असेही शाह यावेळी म्हणाले. Amit Shah On Pok
मला विश्वास आहे की आपण जे काही गमावले आहे, ते लवकरात लवकर परत मिळेल. केवळ भौतिक विकासच नाही, तर काश्मीरची सांस्कृतिक उंचीही लवकरच गाठली जाईल. काश्मीरचे नाव कश्यप होऊ शकते. शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेमिष मठ यावरून काश्मीरमध्येच भारताच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे सिद्ध होते. सूफी, बौद्ध आणि शैल मठांनी काश्मीरमध्ये विकास केला. 8,000 वर्षे जुन्या प्राचीन ग्रंथांत जम्मू-काश्मीर आणि लडाखचा उल्लेख आहे, असेही शहा यावेळी म्हणाले.
शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? राष्ट्रवादी प्रमुखांच्या मातोश्रीचे विधान चर्चेत…
Amit Shah On Pok