Today’s Breaking -महाराष्ट्राची ओळख संतांची भूमी म्हणून जगप्रसिद्ध आहे. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असा उल्लेख कवींनी महाराष्ट्राचा करून दिलेला आहेच.
Today’s Breaking -पण सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक बलस्थानं या भूमीची असताना संपूर्ण देशाला हेवा वाटावा असा मोठा राजकीय वारसा सुद्धा या राज्याला लाभला आहे. अनेक पुरोगामी राजकीय नेते या भूमीने दिलेले आहेत. सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख, आर आर पाटील, विलासराव देशमुख या माजी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला विकासाचं मॉडेल म्हणूनचं नव्हे तर आदर्श राजकीय वारश्याची परंपरा म्हणून देशभरात उदयास आणलं.

Todays Breaking
Today’s Breaking -बाळासाहेब ठाकरेंनी तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा आयाम निर्माण करून दिला! पण अश्या समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांची जणू स्पर्धाच लागली आहे की काय? असं वाटायला लागलं आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांनी तर कहरच केलाय.
चला तर मग समजून घेऊ नेमकं काय आहे प्रकरण..!
शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड हे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानाने कायम चर्चेच्या प्रकाशझोतात असतात. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड यांचा निसटता विजय मिळाला होता. याच निसटत्या विजयाचा त्रागा करत संजय गायकवाड यांनी एका भर सभेत मतदारांवर बोलताना पातळीचं गाठली. त्यांची जीभ इतकी घसरली की राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे..
नेमकं ते काय म्हणाले तुम्हीच पाहा..!
Today’s Breaking -खरंतर यांना लोकप्रतिनिधी तरी कसं म्हणावं असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे. एकीकडे राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना सूरू करून महिलांना आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र महायुती सरकारचे लोकप्रतिनिधीच महिलांबाबत खालच्या थराला जाऊन टीका करून एक प्रकारे महिलांना अपमानित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
खरंतर संजय गायकवाड यांची ही काही पहिली वेळ नसून याआधीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून वाद ओढून घेत अनेकदा त्यांनी प्रयत्न करून बघितला आणि त्यात ते यशस्वीही झालेत. पण यात महाराष्ट्राची राजकीय अस्मिता डागाळली जातेय याचंच वाईट वाटतेय. आणि आता येथे केवळ वाचाळवीरचं जन्माला आलेत की काय अश्या प्रश्नांचं काहूर येथील संपूर्ण जनतेच्या आणि जनसामान्यांच्या मनात घर करून जातेय.