Ramayana

Ramayana Sahasranana Story: कोण होता 1000 डोक्यांचा ‘सहस्त्रानन’? रावण वधानंतर भगवान रामाशी केले युद्ध

Ramayana Sahasranana Story: रामायणात रावणाच्या सर्व भावांचा उल्लेख आहे, परंतु सहस्त्रनानबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे.

Ramayana Interesting Story About Sahasranana: वाल्मिकी असो वा तुलसीदास, सर्वांच्या रामायणात रावणाच्या सर्व भावांचा उल्लेख मिळतो, परंतु ‘सहस्त्रनान’बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. सहस्त्रानन हा रावणाचा भाऊ होता, ज्याने भगवान श्रीरामाशी भीषण युद्ध केले. विशेष म्हणजे, या सहस्त्रनानचा वध माता सीतेने केला आहे. चला तर मग जाणून घेऊन या 1000 डोक्याच्या सहस्त्रनानबद्दल…

कोण होता 1000 डोक्यांचा सहस्त्रनन?

सहस्त्रानन हा भगवान शंकराचा महान भक्त होता. तो शंकराची तपश्चर्या आणि अद्वितीय शक्तींसाठी प्रसिद्ध होते. त्याला 1000 डोकी असल्यामुळे सहस्त्रनन असे नाव पडले. तो खूप शक्तिशाली आणि गर्विष्ठ होता. (Ramayana Interesting Story About Sahasranana)

श्रीराम आणि सहस्त्रनान यांच्यात युद्ध का झाले?
रावणाचा वध आणि अयोध्येत रामाचा राज्याभिषेक झाल्यानंतर सहस्त्राननने भगवान रामाला युद्धाचे आव्हान दिले. त्याने आपला भाऊ रावणाचा मृत्यू हा आपल्या कुळाचा अपमान मानला आणि त्याचा बदला घेण्यासाठी श्रीरामासोबत युद्ध केले.

पौराणिक कथेनुसार, जेव्हा सर्व ऋषी भगवान रामाच्या शौर्याचे गुणगान करत होते, तेव्हा माता सीतेने सहस्त्रनानचा उल्लेख केला. सहस्त्रनानचा पराभव केल्याशिवाय प्रभू रामाचा विजय अपूर्ण मानला जाईल, असे त्या म्हणाल्या. हे ऐकून भगवान रामाने आपल्या सैन्यासह सहस्रानानच्या राज्यावर हल्ला केला. या युद्धात लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, विभीषण आणि हनुमानासह संपूर्ण सैन्य सामील होते. याशिवाय या युद्धात माता सीताही श्रीरामांसोबत होत्या. (Ramayana Interesting Story About Sahasranana)

सहस्त्रानन आणि भगवान रामाचे युद्ध

श्रीराम आणि सहस्त्रनान यांच्यात भयंकर युद्ध झाले. सहस्त्रनानने आपली अद्वितीय शक्ती आणि हजार डोके वापरून भगवान रामाच्या सैन्याचे अतोनात नुकसान केले. त्याने रामावर अनेक घातक शस्त्रे डागली. भगवान रामानेही आपली एकापेक्षा एक अचाट शस्त्रे वापरली, परंतु सहस्त्रनानने ती सर्व हाणून पाडली. युद्धादरम्यान सहस्त्रनानने एक शक्तिशाली बाण सोडला, जो भगवान रामाच्या छातीत घुसला. या हल्ल्याने प्रभूराम बेशुद्ध झाले.

माता सीतेचे विराट रुप
प्रभू राम बेशुद्धावस्थेत पाहून माता सीता क्रोधित झाल्या. त्यांनी अक्राळविक्राळ रूप धारण करून एकाच वेळी सहस्त्रनानची हजारो मुंडके कापून टाकली. या रूपात माता सीतेने देवी कालीचे रूप धारण केले. सहस्त्रनानचा वध केल्यानंतर त्यांनी इतर योद्ध्यांनाही मारले आणि त्यांच्या छिन्नविछिन्न मस्तकीला पुष्पहार घातला. सीतेच्या या राक्षसी रूपामुळे संपूर्ण पृथ्वीचा नाश होण्याचा धोका निर्माण झाला होता. तेव्हा ब्रह्माजींनी रामाला चैतन्य बहाल केले. भगवान रामाने माता सीतेला शांत केले.

14 दिवस साखर सोडल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या फायदे…

(Ramayana Interesting Story About Sahasranana)

More From Author

Sugar Side Effects

Sugar Side Effects : 14 दिवस साखर सोडल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या फायदे…

Jairam Ramesh

Jairam Ramesh : भाजप नेते Manmohan Singh यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांची मुक्ताफळे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत