PM Svamitva Yojna: ग्रामीण भारताच्या विकासाला चालना मिळणार आहे.
PM Svamitva Yojna : केंद्र सरकाराने भारतातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने विविध योजना आणल्या आहेत. ग्रामस्थांसाठी केंद्रीय योजनांपैकी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान स्वामी योजना आहे. ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करणे, हा या योजनेमागील केंद्र सरकारचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 65 लाखांपेक्षा जास्त मालमत्ताधारकांना मालमत्ता कार्ड वितरित करणार आहेत.
ग्रामीण भागात असे अनेक लोक राहतात, ज्यांच्यांकडे त्यांच्या जमिनीचे व घरांचे मालकी हक्क आणि सरकारी कागदपत्रे नाहीत. या लोकांसाठी पीएम स्वामीत्व योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. ही योजना पंतप्रधान मोदींनी एप्रिल 2020 मध्ये सुरू केली होती, जी पहिल्या टप्प्यात हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशमधील गावांमध्ये लागू करण्यात आली होती. PM Svamitva Yojna
या योजनेमुळे लोक केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार नाहीत, तर ते स्वावलंबीही होतील. या अंतर्गत लोकांना केवळ मालकी हक्क मिळणार नाही, तर लोकांना बँकेतून लोव मिळणे अधिक सोपे होईल. मालमत्तेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यातही मदत होईल. PM Svamitva Yojna
काय आहे स्वामित्व योजना? पाहा…
देशातील सर्व न्यायालयात सर्वाधिक खटले हे मालमत्ते संबंधित आढळतात. गावागावात जमिनीचे वाद नवीन नाहीत. देशात एकही गाव असे आढळणार नाही, जिथे जमिनीवरुन वाद झाला नसेल. कित्येक लोकांची हयात कोर्टात खेटा घालून गेली असेल. ही कटकट आता कायमची संपणार आहे. यासाठी मोदी सरकारने स्वामित्व योजना आणली आहे. या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी देशातील 230 हून अधिक जिल्ह्यांतील सुमारे 50 हजार गावांमधील मालमत्ताधारकांना स्वामीत्व योजनेंतर्गत 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणार आहेत.

पीएम मोदी शनिवारी 18 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रॉपर्टी कार्डचे वितरण करतील. या कार्यक्रमांतर्गत छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोराम, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशातील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्ड जारी केले जातील. पंतप्रधान स्वामित्व योजना म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.PM Svamitva Yojna
पंतप्रधान स्वामित्व योजना म्हणजे काय?
स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी डिजिटल पद्धतीने तयार केल्या जातात. यामध्ये लोकांना जमिनीचा मालकी हक्क दिला जातो, जेणेकरून जमिनीचे वाद कमी करता येतील. तसेच, जमिनीचे मालकी हक्क स्पष्ट करणे हा या योजनेचा उद्देश आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळू शकेल. या योजनेत ड्रोन सर्वेक्षण, जीआयएस आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मालकी हक्क स्पष्ट केले आहेत. या योजनेत सर्वेक्षणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येत आहे.
योजनेचे फायदे
ही योजना जमिनीच्या मालकीचा स्पष्ट पुरावा देते. त्यामुळे जमिनीशी संबंधित वाद कमी होतील. जमिनीची मालकी स्पष्ट झाल्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामेही जलद गतीने होणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचीही सोय होणार आहे. शेतकरी त्यांच्या जमिनीच्या आधारे सहज कर्ज घेऊ शकतात. अशाप्रकारे ही योजना ग्रामीण भारतातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करत आहे. PM Svamitva Yojna
मुकेश अंबानींसाठी खुशखबर; तिसऱ्या तिमाहीत Reliance ची 18,540 कोटी रुपयांची कमाई
